कर्जदारांना वैतागून दारावे गावातील तरुणाची आत्महत्या

 


नवी मुंबई - कर्जदार वारंवार कर्ज मागत असल्याने तणावात असलेल्या तरुणाने सीवूड दारावे गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.सदर तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असता त्यातही त्याचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे एपीआय स्वप्नील इज्जेपवार यांनी दिली.सदर प्रकरणाची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

                     कोरोना काळात बहुतांश जणांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांवर आर्थिक संकट ओढावले.त्यातच मोठ्या प्रमाणात नागरिकांवर विविध प्रकारचे कर्ज असल्याने ते फेडायचे कसे असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.यातच कर्जदार आणि बँकांनी कर्ज वसूल करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केल्याने आजमितीस जगायचे कसे असा प्रश्न कर्जदारांसमोर उभारला आहे.याचाच प्रत्यय शनिवारी दारावे गावात दिसून आला.दारावे गावात राहणाऱ्या अभिषेक यशवंत माहे (२६) या तरुणाने कर्जदार वारंवार कर्ज मागण्यासाठी तगादा लावत असल्याने मानसिक तणावात येऊन शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास दारावे गावातील तलावात उडी मारून आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी त्याने एक चिट्ठी लिहून ठेवली असता त्यामधून सदर प्रकार उघडकीस आला.अभिशेष हा आपल्या परिवारासह दारावे गावात गेल्या अनेक वर्षांपासून राहत होता.त्याच्या आत्महत्येची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास करण्यात येईल असे यावेळी नेरुळ पोलीस ठाण्याचे एपीआय स्वप्नील इज्जेपवार यांनी सांगितले. 


Popular posts
नवी मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी की वसुली अधिकारी ?, एपीएमसी मधील मार्जिनल स्पेस धारकांकडून केली जाते ७ ते ८ लाखांची प्रतिमहिना वसुली ?, अधिकाऱ्यांकडून कारवाई कमी आणि सेटलमेंट जास्त होत असल्याची चर्चा ?
Image
करावे गावातील ही चार मजली अनधिकृत इमारत ९० टक्के पूर्ण ?, कुठे गेले मनपा व सिडकोचे अतिक्रमण विभाग अधिकारी ?, मोठ्या इमारती सोडून छोट्या इमारतींवर मनपा व सिडकोचा हातोडा
Image
युवकांनो...“ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न
Image
नेरुळ विभाग कार्यालयाची अनधिकृत बांधकामावर संशयास्पद कारवाई ? दिखाऊ कारवाई नंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाला जोमाने सुरवात, बालाजी मंदिराच्या माघील बाजूस तीन ते चार अनधिकृत बांधकामांना कोणाचे अभय ?
Image
*स्वच्छ सर्वेक्षणातील 'सुपर स्वच्छ लीग' या नव्याने समाविष्ट विशेष कॅटेगरीत, देशातील तीन शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश - महाराष्ट्रातील एकमेव शहर*
Image