नवी मुंबई - तुर्भे मधील शिवशक्ती नगर मध्ये एका इमारतीवर बेकायदेशीरपणे मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून त्याचा त्रास त्याच्या लगतच असलेल्या शाळा तर नागरिकांना होऊ लागला आहे.त्यामुळे सदरील मोबाईल टॉवर तत्काळ काढण्यात यावा अशी मागणी तुर्भे स्टोर मधील भाजप वार्ड अध्यक्ष संतोष राठोड यांनी तुर्भे पोलिसांकडे लेखी स्वरूपात केली आहे.या टॉवरवर कारवाई करून नागरिकांना त्रास मुक्त करण्यात यावे असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तुर्भे शिवशक्ती नगर मधील इंडियन पेट्रोल पंपाच्या शेजारीच असलेल्या एका इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला असून त्या नंतर शाळा क्रमांक २२ डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या माघे व समता हिंदी विद्यालय शाळे समोर असे एकूण तीन मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे.या मोबाईल टॉवर मध्ये विभागातील नागरिकांना ह्दय विकाराचे आजार,महिलांच्या गर्भाशयाला होणारे आजार,लहान मुलांच्या डोळ्यावर परिणाम असे परिणाम होत आहेत.त्यामुळे सदरील मोबाईल टॉवर तत्काळ हटवणे गरजेचे आहे असे राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे.