कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?

नवी मुंबई :- अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत इमारती अथवा पब किंवा बार यांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आजमितीस अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी शासन ,प्रशासन यंत्रणा खळबळून जागी होते आणि कारवाया सुरु होतात.जरी कारवाया सुरु असल्या तरी अधिकारी हातचा राखून कारवाया करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.नवी मुंबई शहरात बहुतांश अनधिकृत इमारती उभ्या राहत असून त्यावर विविध विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत.मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आर्थिक आशीर्वाद देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचे दिसून येते.याच धर्तीवर कोपरखैरणे विभाग कार्यालयात १ मार्च २०२४ रोजी सेक्टर ५ मधील एका इमारतीची तक्रार दाखल झाली असता विभागाकडून त्याची पाहणी करण्यात आली.त्यावेळी त्याच इमारतीच्या समोर अजून एका इमारतीचे काम सुरु असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले.त्यावेळी कोपरखैरणे विभागाकडून तक्रार प्राप्त इमारतीवर कारवाई करण्याऐवजी त्याच्या समोर असलेल्या इमारतीवर कारवाई केली.आणि तक्रार प्राप्त इमारतीला लवकर इमारत पूर्ण करण्याची जणूकाही सूचनाच केली.सदरील इमारत हि अनधिकृत आहे,त्यावर तक्रारही आहे,याची माहिती असूनही कोपरखैरणे विभागाकडून का कारवाई करण्यात येत नाही.असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

Popular posts
<no title>
Image
शिरवणे गावातील त्या अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु, काही दिवसांपूर्वीच झाली होती कारवाई
Image
नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर
Image
अनधिकृत इमारतीवरील तोडकं कारवाई नंतर नेरुळ विभाग शांत ?, कारवाई झालेल्या इमारती पूर्ण होण्याच्या मार्गावर, स्वतःच्या स्वार्थासाठी शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात घालणार अधिकारी ?, नेरूळगाव, शिरवणे गाव, सारसोळे गावात अनधिकृत इमारतींची स्पर्धा
Image
नवी मुंबई उद्यान घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित,कंत्राटदारावरही दंडात्मक कारवाई - राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या मागणीला यश
Image