अगोदर नोटीस, मग कारवाई, नंतर सेटलमेंट, इमारत पुन्हा उभी ? , तुर्भे विभाग कार्यालय भ्रष्टाचाराच्या विळख्यात ? , तुर्भे विभाग अधिकारी व सिडको अधिकारी यांच्या भूमिकेवर संशय ?

नवी मुंबई :- तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असल्याची माहिती बातम्या, सोशल मीडिया च्या माध्यमातून मिळुनही सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे गप्प असल्याने त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.एक पेक्षा जास्त वेळा कारवाई झालेल्या इमारतींचे बांधकाम पुन्हा सुरु झाल्याने त्यासाठी मोठी सेटलमेंट झाली असल्याची चर्चा परिसरात आहे.तोडकं कारवाई झालेल्या इमारती काही दिवसांतच झपाट्याने उभ्या राहत असल्याने त्या किती भक्कम असतील याचा अंदाज लावण्यात येत आहे.भविष्यात जर बेलापूर सारखी घटना घडली तर अनेकांना जीवाला मुकावे लागेल,मात्र याचे कोणतेही सोयर सुतक मनपा अधिकाऱ्यांना नसल्याने नागरिक मेले तरी चालतील,मात्र अधिकाऱ्यांना जगवणारा भूमाफिया जगला पाहिजे या भूमिकेत असल्याने बांधकाम व्यावसायिक कोणतीही भीती न बाळगता सुसाट सुटले आहेत.

            सानपाडा गावात अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास येताच सिडकोने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली.त्यावेळी सानपाडा गावातील हेमंत विष्णू मढवी यांचे सर्व्हे क्रमांक १ व ५४ या जागेवर इमारतीचे काम सुरु होते.त्यावर ३० /०४ /२०२४ रोजी सिडकोकडून करण्यात आलेल्या स्थळ पाहणी दरम्यान निदर्शनास आले कि अंदाजे ६०.०० चौ.मी (अंदाजे) मापाचे R.C.C (G + २) चे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे ०८ / ०५ / २०२४ रोजी हेमंत विष्णू मढवी यांना नोटीस बजावण्यात आली.सदर बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका ठेवत मढवी यांना संबंधित कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.त्यांनी वेळेत कागदपत्रे सादर न केल्याने अखेर त्या इमारतीवर तोडकं कारवाई करण्यात आली. त्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्याच जागेवर पुन्हा बांधकाम सुरु करण्यात आले आहे.सदरील बांधकाम धारकाने सिडको बरोबर सेटलमेंट केली असल्याची चर्चा गावात सुरु झाली असता पुन्हा त्याच इमारतीवर सिडको कडून कारवाई करण्यात आली.दोनदा कारवाई झाल्यानंतर पुन्हा काम सुरु होणार नाही असे चित्र दिसत असतांना पुन्हा त्याच जागेवर डागडुजी करून इमारतीचे काम जोमाने सुरु करण्यात आले.यावर तुर्भे विभाग अधिकारी भरत धांडे यांच्याशी संपर्के साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.त्यामुळे मनपा तर या अनधिकृत इमारतीला पाठिंबा देत नाही अशी चर्चा गावात सुरु झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे जाळे तयार होत असल्याने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने कारवाईचा धडाका लावला आहे.शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवत असतांना अनेकांना नोटीस बजावण्याचे कामही सिडको कडून करण्यात येत आहे.अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत इमारती अथवा पब किंवा बार यांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आजमितीस अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी शासन ,प्रशासन यंत्रणा खळबळून जागी होते आणि कारवाया सुरु होतात.जरी कारवाया सुरु असल्या तरी अधिकारी हातचा राखून कारवाया करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.नवी मुंबई शहरात बहुतांश अनधिकृत इमारती उभ्या राहत असून त्यावर विविध विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत.मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आर्थिक आशीर्वाद देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असल्याचे दिसून येते.


Popular posts
वैश्विक स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले राष्ट्रप्रमुख, विश्वगुरू म्हणून साऱ्या जगतात किर्तीमान झाले,याचा सार्थ अभिमान, रणवीर राजपूत - गवर्नमेंट मिडिया (अधिस्वीकृती धारक),महाराष्ट्र शासन यांचा लेख
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे दोन महिन्यात दोन मजले उभे ? , दोनदा कारवाई नंतर १५ लाख घेऊन बांधकामाला परवानगी दिल्याची चर्चा ? , दिवाळी अगोदर दोन मजले पूर्ण करण्याचे आदेश कोणाचे, सिडको चे मनपाचे ?
Image
बालाजी मंदिराच्या माघील बाजूस दगड फोडून अनधिकृत बांधकामे, सिडको व मनपाच्या कारवाई नंतरही अनधिकृत कामे जोमात, दगड फोडीमुळे बालाजी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींना धोका ? , सिडको व नवी मुंबई महापालिकेचे दुलर्क्ष,, घटना घडल्यावर होणार का कारवाई ?
Image
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image